🎯अरुणा *दिल्लीच्या पहिल्या महापौर* झाल्या (१९५८). या काळात त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी प्रयत्न केले. लिंक हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अमेरिकेत भारताच्या राजदूत म्हणूनही त्यांनी कार्य केले. दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या पेट्रिऑट या इंग्रजी दैनिकाशी त्या शेवटपर्यत जोडल्या होत्या. ‘इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटी’, ‘ऑल इंडिया पीस कौन्सिल’, ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन’ इत्यादी सामाजिक संस्थांशी त्या संबंधित होत्या.
🎯आपल्या अखेरच्या काळात दिल्लीतील झोपडपट्टीतील लोकांसाठी त्यांनी प्रौढ साक्षरता, वैद्यकीय मदत व रोजगार निर्मिती अशा स्वरूपाचे भरीव कार्य केले. साधी राहणी, समाजवादी विचारसरणी आणि निर्भयता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष होत. त्यांच्या ट्रॅव्हल टॉक या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत पंडित नेहरू त्यांचे वर्णन करताना म्हणतात, ‘अरुणा हे एक अस्वस्थ आणि दुसऱ्यांना अस्वस्थ करणारे व्यक्तिमत्त्व आहे.’
🎯अरुणा यांना अनेक मानसन्मान मिळाले. सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक (१९५५), लेनिन शांतता पुरस्कार (१९७५), आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा ‘जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ (१९९१) आदी सन्मान त्यांना मिळाले. लेनिन शांतता पुरस्काराची रक्कम त्यांनी जनतेच्या आणि धर्मार्थ कार्याला देणगी दिली.
🎯भारत सरकारने १९९२ मध्ये त्यांना *पद्मविभूषण* तसेच सर्वोच्च असा *भारतरत्न* पुरस्कार मरणोत्तर देऊन त्यांचा गौरव केला (१९९७).
🎯भारतीय टपाल खात्याने त्यांच्या छायाचित्राचे टपाल तिकीट त्यांच्या कार्याचा सन्मान केला (१९९८).
🎯दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
🎯अश्याच दररोजच्या चालू घडामोडी साठी जॉईन करा Telgram चॅनल 👇👇
https://hottg.com/currentshiva
>>Click here to continue<<