प्रगतीची, पुढे जाण्याची आस खूप पुढची गोष्ट आहे… खरतर ‘ यातून बाहेर पडायचं’ ही इच्छा बेसिक गोष्ट आहे.. एकदा का या गोष्टीने मनात घर केलं की परिस्थितीचे पाश तोडत, नशिबाला भिडत माणस पुढे जातात. बाहेर पडण्याचा ध्यास मनाला लावून घ्यायचा असेल तर मोठं चित्र मनात उभं राहायला हवं.. आपण स्वतःहून ते चित्र उभं करायला हवं.. किमान मनात तरी आपल्याला हव तस घडायला काय हरकत आहे.. कित्येक जण हीच मनातली चित्र प्रत्यक्षात जगू लागतात.. प्रगतीची, मुक्ततेची वाट आपल्या मनात रुजावी लागते.. खूप पक्की व्हावी लागते.. बाहेरच्या जगातील झगमगाकडे पाठ फिरवून आतल्या अंधाराची जाणीव जागी ठेऊन काजव्यांसारखं मिणमिणत जगणारी माणसं स्वतःच्या आयुष्यात पुढे लख्ख अस चांदणं पेरत असतात…
~निरंजन
#जगणं
>>Click here to continue<<