या प्रक्रियेत प्रिलिम्स हा कळीचा घटक आहे.. तुमच्या प्रिलिम्स क्लिअर होत असतील तर एक गोष्ट स्पष्ट असते की तुम्हाला पद मिळण्याच्या संधी जास्त आहेत तसेच तुम्ही खऱ्या स्पर्धेत आहात. याउलट वारंवार परीक्षा देऊनही आपली प्रिलिम्स निघत नसेल तर काहीतरी खूप चुकीचं होतय.. आपण ज्याला अभ्यास म्हणतोय त्यामधे नक्कीच काही चुका होत असतील किंवा काहीतरी कमी पडत असेल. नेमक चुकतय काय हे शोधणे आणि त्यावर काटेकोरपणे काम करून पुढील परीक्षेत यशस्वी होणे हाच एकमेव मार्ग आपल्यापुढे असतो. पण यालाही वेळेची मर्यादा असणे आवश्यकच आहे. आपल्या पहिल्या प्रयत्नात चुका झाल्या तर दुसऱ्या किंवा फार फार तर तिसऱ्या प्रयत्नात तरी प्रिलिम्स निघायला पाहिजे.. खरच खूप गरजेचं आहे हे.. कारण जोपर्यंत आपण मेन्सला नसतो तोपर्यंत आपण खऱ्या स्पर्धेतच नसतो..
>>Click here to continue<<