आज एका विवाह सोहळ्याला उपस्थित रहायचा योग आला. याबद्दल आवर्जून लिहावं आणि शेअर करावंसं वाटलं त्याला एक महत्त्वाचं कारण आहे. नवरा मुलगा IAS अधिकारी तर नवरी मुलगी सहायक गटविकास अधिकारी असलेल्या या जोडीने नोंदणी पद्धतीने (Registered Marriage) विवाह केला. पुण्यात अगदी मोजके पाहूणे आणि मित्रपरीवार यांच्या उपस्थितीत हा देखणा विवाह सोहळा पार पडला. ना कुठली घाई-गडबड ना कुठला गोंधळ ना गर्दी ना गोंगाट.. उलट कुमार सानू, ए आर रहेमानची गाणी होती सोबतीला.. "Big Fat Indian Wedding" काळात या उच्च पदांवर कार्यरत अधिकारी जोडप्याने तरूणाई साठी आदर्श निर्माण केला आहे असे म्हणायला हरकत नाही. एकूणच लग्न म्हटलं भरपूर उधळपट्टी वगैरे आजकालचा ट्रेंड झाला आहे. त्यातही अधिकारी लोकांची लग्नं हा तर एक मोठाच विषय झाला आहे सध्याच्या काळात. या सर्व गोष्टीना फाटा देऊन या अधिकारी जोडीने घेतलेल्या निर्णयासाठी ते खरेच अभिनंदनासाठी पात्र आहेत. अशी उदाहरणं अगदी अपवाद म्हणून राहत असली तरीही असे लोक आहेत आपल्या आजुबाजुला जे अपवाद म्हणून जगण्याची हिम्मत करतात.
(या बाबतीत लिहावं एवढी माझी पात्रता आहे की नाही हे माहिती नाही परंतू तरीही ती हिम्मत करतोय, कारण मी आणि माझी पत्नी, आमच्या दोघांची इच्छा असुनही एवढं तर नाही करू शकलो, परंतू आम्ही कमीतकमी नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये एका मंदिराच्या सभागृहात लग्न केले आहे.)
>>Click here to continue<<