" सरकारशी संपूर्ण असहकार करा, विद्यार्थ्यानी शाळा बंद कराव्यात, कामगारांनी कारखाने बंद करावेत, पंतप्रधान निवासाला घेराव घाला, गोळीबार होईल हटू नका, पोलीसांनी व सैन्यानेही सरकारचे अनैतिक आदेश पाळू नये." या चळवळीला दुसरे स्वातंत्र्ययुद्ध संबोधले गेले. जगजीवनराम व यशवंतराव चव्हाण यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची विनंती करण्यात आली. जयप्रकाश नारायण सक्रिय झाले.
गुजरातमध्ये व बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलने सुरू झाली.चिमणभाई पटेल यांना चिमणचोर म्हटले गेले व या हिंसक आंदोलनात 95 जण ठार झाले.काँग्रेस आमदारांना घराबाहेर खेचून मारले.तर काही जणांकडून जबरदस्तीने राजीनामे घेतले गेले. याचे लोण बिहारमध्येही पसरले. संपूर्ण क्रांतीचा नारा दिला गेला. संपूर्ण देशात अराजक सदृश परिस्थिती निर्माण झाली.
आता बाईंसमोर दोनच पर्याय होते. To quit or.... इंदिरा गांधींनी दुसरा दुर्दैवी पर्याय निवडला... आणीबाणी. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय हे तात्कालिक कारण होते.
@@@@@
संदर्भ: 1)Indira Gandhi, the emergency and Indian democracy : P. N. DHAR
2) The judgement : kuldeep nayyar
3) महाराष्ट्र टाइम्सचे लेख : 25 जून, 2 जुलै, 9 जुलै व 16 जुलै 2000. ( कुमार केतकर)
*
तळीरामाची टीप:
आणीबाणीत सर्व सरकारी कर्मचारी वठणीवर आलेले. सर्व जण वेळेच्या अगोदरच पंधरा मिनिटे कार्यालयात येत. लोकांची कामे तत्परतेने होत. सगळ्या रेल्वे वेळापत्रकानुसार चालत.
त्या काळातील सरकारी कार्यालयातील खूपच किस्से आहेत. ते परत कधीतरी...
>>Click here to continue<<